
Urja Sayyam | उर्जा-संयम
माणसानं निसर्गात बदल घडवण्याची प्रक्रिया सहस्त्रावधी वर्षं
सुरू असली; तरी जोवर हाताशी असणा-या ऊर्जा आणि तंत्रज्ञान
ह्यांचं प्रमाण कमी होतं, तोवर ह्या बदलाचं प्रमाणही कमी होतं.
परंतु, गेल्या तीनशे वर्षांत तंत्रक्रांती आणि ऊर्जाक्रांती ह्यांतून
‘विकासा’चं एक नवं प्रतिमान उदयाला आलं. उत्पादन
वाढलं-उपभोग वाढले. कष्ट कमी होऊन जीवन सुखी झालं.
पण दुर्दैवानं ही ‘सुखं’ त्यांच्याहून अधिक ‘दु:खं’च निर्माण
करताहेत ! अतिरेकी ऊर्जा-वापरामुळे आतून माणूस आणि बाहेरून
निसर्ग मोडून पडतो आहे. संसाधनं कमी होताहेत, प्रदूषण वाढतंय,
एंट्रॉपी वाढतीये.
ह्यावर उपाय एकच: ऊर्जेचा हा अतिरेक टाळणं! ‘भांडवली
ऊर्जां’चा वापर टाळून ‘आय ऊर्जां’च्या आधारे संयमितपणे
जगायला लागणं.
प्रचलित ‘विनाश-प्रतिमाना’ची चिकित्सा आणि चिरफाड
करणारा आणि नव्या प्रतिमानातली विकासनीती आणि जीवनशैली
ह्यांविषयी मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०१४
- सद्य आवृत्ती : जानेवारी २०१४
- मुखपृष्ठ : गिरीष सहस्त्रबुद्धे
- मांडणी : अमेय कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : A-05-2014
More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी


.jpg)
.jpg)