Rajhans Podcasts
निवळशंख पाणी | Dr .Rewa Dubhashi |
गोमंतकाच्या हिरव्यागर्द शेताभाटांत वाढलेल्या; पावसापाण्यात, पागोळ्यांत मनसोक्त भिजलेल्या एका निसर्गवेड्या मनस्वी मुलीच्या जडणघडणीच्या आणि व्यावसायिक स्थैर्यापावेतोच्या प्रवासातील हे कडू-गोड जीवनानुभव. तिच्या त्या एकाकी धडपडीची, ध्येयाप्रत पोहोचण्यासाठीच्या जिद्दीची ते जाणीव तर करून देतीलच; परंतु अशा संघर्षाच्या वाटेवरून चालणाऱ्यांना प्रेरकही ठरतील. या लेखांतील हृदयंगम शब्दवैभव आणि लोभस लालित्य आपल्याला खिळवून ठेवील; शिवाय सखोल व्यासंग, वैचारिक परिपक्वता आणि भावनिक उत्कटता यांनी परिणत असे शाश्वत जीवनमूल्यांवरील श्रद्धा दृढ करणारे हे लेखन समकालीन मराठी ललित लेखनालाही निश्चितच नवी उंची देईल. लेखिकेच्या आजवरच्या आयुष्यातील नानाविध बऱ्यावाईट अनुभवांच्या तरंग आणि भोवऱ्यांचा भर ओसरल्यावर शेवटी ओंजळीत उरलेले हे निवळशंख पाणी...
निकोबारची अनोखी सफर |
'निकोबार! समुद्राच्या निळाईत उठून दिसणारी पाचूची बेटं. जणू भारतमातेची उजवी ‘कर्णफुलं’! सोनेरी वाळूच्या किनाऱ्यांनी सजलेली...कल्पवृक्षांच्या विपुल वनराईने नटलेली...या बेटांवरच्या अपरिचित आदिम जमाती अन् त्यांच्या अनोख्या चालीरीती....त्सुनामीने सर्वांत जास्त घायाळ केले ते निकोबारला, तरीही पुन्हा त्यावर उमेदीने वसवलेली वस्ती....अशा या अस्पर्शित, काहीशा ज्ञात, खूपशा अज्ञात भूमीचा इतिहास, भूगोल आणि लोकसंस्कृती उलगडून दाखवणारे निकोबारची नवलाई.'
सेक्युलॅरिझम, धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा
राज्यघटनेत 'सेक्युलर' शब्द कधी आला?'सेक्युलॅरिझम' व 'धर्म' यांचा घटनेला अभिप्रेत असणारा अर्थ कोणता आहे ?घटनेने लौकिक अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे तरी किती? 'समान नागरी कायद्या'ला विरोध का होतो?उत्तराखंड राज्याने केलेला 'समान नागरी कायदा' काय आहे? 'वक्फ कायदा' आहे तरी काय?सेक्युलर न्यायालयांनी धार्मिक न्यायालयांसारखे निवाडे द्यावेत काय ? या व यांसारख्या प्रश्नांची मूलभूत चिकित्सा करणारा, विचारांना नवी दिशा देणारा, काहीसा धक्कादायक पण चिंतन करायला लावणारा, विशेषतः तरुणांनी व विद्यार्थ्यांनी वाचलाच पाहिजे असा विचारप्रवर्तक ग्रंथ.