
Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:।
मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली,
तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो
(आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो).
* फाळणीचे मूलकारण कोणते होते ?
* जिनांनी द्विराष्ट्रवाद फाळणीसाठी मांडला होता की अखंड भारतासाठी ?
* फाळणीऐवजी येणा-या अखंड भारताची राज्यघटना कशा स्वरूपाची
राहणार होती ?
* राष्ट्रवादी मुसलमानांना कोणत्या स्वरूपाचा अखंड भारत पाहिजे होता ?
त्यांचा फाळणीला विरोध कशासाठी होता ?
* अखंड भारतात तीन विषयांपुरते तरी ५६५ संस्थानांचे विलीनीकरण
झाले असते काय ?
* हैदराबाद संस्थानाचे काय झाले असते ?
* ‘‘फाळणी झाली नसती, तर सर्व भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला
असता!’’ असे सरदार पटेल का म्हणाले होते ?
* आणि १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘‘जर
भारत अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे
लागले असते... मुसलमान शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा
फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप
काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान व वैभवशाली बनण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे.’’ बुद्धिवादी आंबेडकरांनाही येथे परमेश्वराचे
नाव का घ्यावे लागले ?
**अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात नव्वद वर्षांच्या स्वातंत्र्याच्या व
फाळणीच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणारा,
फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा,
राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१२
- सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०२१
- मुखपृष्ठ : कमल शेडगे
- छायाचित्र मांडणी : नयन बारहाते , मनोहर दांडेकर
- राजहंस क्रमांक : H-01-2012
More Books By Sheshrao More | शेषराव मोरे


.jpg)


