Sangram | संग्राम
एक सशस्त्र क्रांतिकारक वधस्तंभावर चढून आपल्या जिवाचे
बलिदान करतो, तेव्हाच शंभर नि:शस्त्र प्रतिकारकांचा जन्म
होऊ शकतो !
क्रांतिकारकांच्या प्राणत्यागाचे मर्म हे होते !
स्वातंत्र्य-देवतेला स्वत:च्या रक्ताचा नैवेद्य त्यांनी दाखवला.
ते अग्निसंप्रदायाचे उपासक होते.
'तुमच्याविरुध्द या देशात हजारो बंडे उभी राहतील' असे
उमाजी नाईक यांनी १८२७ सालीच कंपनी सरकारला
बजावले होते.
त्यांचे बोल खरे ठरले !
मंगल पांडे, वासुदेव बळवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर, गदर
पार्टी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग अशी ही क्रांतिकारकांची
परंपरा फार, दीर्घ, प्रखर आणि तेजस्वी आहे. 'इन्कलाब
जिंदाबाद ! हे त्यांचे प्राणतत्त्व होते.
हा होता मातृभूमीच्या मुक्ततेसाठी चाललेला संग्राम.
वि. स. वाळिंबे यांच्या सत्तावन्न ते सत्तेचाळीस या ग्रंथातली
सशस्त्र क्रांतीची गाथा एकत्र करून सिध्द झालेले हे पुस्तक.
(संग्राम)
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०००
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २००९
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : B-01-2000