Maharashtra Gatha Bhag 1 | महाराष्ट्र गाथा भाग १

Maharashtra Gatha Bhag 1 | महाराष्ट्र गाथा भाग १

महाराष्ट्र देशाने प्राचीन काळापासून आपले स्वत्व जपले,

प्रादेशिकतेचा अतिरेक न करता राष्ट्रधर्म वाढवला.

संपूर्ण हिंदुस्तान यवनांच्या तावडीत सापडलेला असताना 

महाराष्ट्राने मराठी धर्म, संस्कृती टिकवण्याचा यशस्वी प्रयोग

केला.

मराठी समाजाने देशाला अनेक लोकविलक्षण व्यक्ती आणि

संस्थांचे योगदान केले.

ब्रिटिश राजवटीत राजकारण, समाजकारण व सांस्कृतिक 

क्षेत्रात झपाट्याने अध:पतन चालू असताना महाराष्ट्राने स्वत:ला 

सावरले आणि परकीय राजवटीच्या बुद्धीभेदाला बळी न 

पडता आपले प्रबोधन व आधुनिकीकरण घडवून आणले.

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, रोमहर्षक 

घडामोडी झाल्या.

राष्ट्रवादा, सामाजिक सुधारणा, पाश्चात्य विचारसरणीतील

उदारमतवाद, सशस्त्र क्रांती, राष्ट्रीय चळवळ - एक ना दोन

शेकडो घडामोडी.

अन त्यात गुंतलेल्या, त्यांच्या कर्त्या करवित्या कैक मराठी 

वा अमराठी व्यक्ती.

एकोणिसाव्या शतकातील राजकारण, धर्म, संस्कृती, शिक्षण 

पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राच्या स्तिमित 

करणा-या कर्तृत्वाचा वेधक आलेख.

ISBN: 978-81-7434-186-0
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जून २०००
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : F-05-2000